भिजलेले डोळे…
भिजलेल्या डोळ्यांना बोलायची गरजच काय?
आठवणींना तुझ्या विसरायची गरजच काय?
डोळे भिजतील, आठवणींना ऊत येइल,
या अश्रुंना, आठवणींना थोपवायची गरजच काय?
तु होतास तेव्हा हेच डोळे आनंदाने फुलायचे,
मन तुझ्या असण्याने हिंदोळ्यावर झुलायचे,
आकाशाकडे पाहुन स्वप्नांमध्ये पळायचे.
तुझ्या स्पर्शाने मग तन अन् मन जळायचे.
तु असला की दिवस दिवस वाटायचा
रात्री मग त्याच दिवसाचा पाढा उजळायचा
प्रत्येक क्षण अशीच आठवण मिळवायचा
अन् मनातल्या तुझ्य कप्प्यात जाऊन मिसळायचा
तु गेलास अन् दिवसाचा काळोख झाला
रात्रीचा, झोपेचा पत्ताच नाहीसा झाला
क्षण क्षण वाटु लागला टोचणारा भाला
मनातला तुझा कप्पाही मग भकास झाला
डोळे आता असतात भिजलेले
मन असते आठवणींत गुरफटलेले
तुझा आभास प्रत्येक क्षणांतला
करतो माझे जग विस्कटलेले
-विकास

vicky manal yaar tula… u r THE BEST…
eka oli warun kashi kay tu kawita kru shaktos????
great…